Chhaava movie review : अंगावर काटे आणि डोळे अश्रुंनी गहिवरून आले कसा आहे छावा, वाचा रिव्ह्यू .

Chhaava movie review :
Chhaava movie review :
चित्रपटाचे नाव: छावा
प्रकाशन तारीख: १४ फेब्रुवारी २०२५
सिनेमा टॉकीजचे रेटिंग : 8 /10
कलाकार: विकी कौशल, रश्मिका मंदाना, विनीत कुमार सिंग,संतोष जुवेकर,आशुतोष राणा,दिव्या दत्ता, अक्षय खन्ना, डायना पेंटी, सारंग साठे,सुरवत जोशी. 
दिग्दर्शक: लक्ष्मण उतेकर
निर्माता: मॅडाॅक फिल्म्स आणि  दिनेश विजान

 

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

 

Chhaava movie review :

‘छावा’ चित्रपटाच्या ट्रेलरपासुनच या सिनेमाची उत्सुकता सगळ्यांना लागलेली होती आणि ती आता पुर्ण झाली आहे. छत्रपती संभाजी महाराज्यांच्या चरित्रावर आधारित असलेली कथा आपल्याला पहायला मिळते. छावा चित्रपट हा शिवाजी सावंत यांच्या ‘छावा’ या कादंबरीवरुन प्रेरित होऊन बनवलेला सिनेमा आहे. एकतर ऐतिहासिक चित्रपट बनवण्याचे धाडस सहसा कोणी करीत नाही पण लक्ष्मण उतेकरांनी अगदी चोखपणे हे शिवधनुष्य उचललेलं आपल्याला पहायला मिळते.

Chhaava Cast :

छत्रपती संभाजी महाराजांच्या भुमिकेत विकी कौशल, येसूबाईंच्या भुमिकेत रश्मिका मंदाना, कवी कलशांच्या भुमिकेत विनीत कुमार सिंग, रायाजीच्या भुमिकेत संतोष जुवेकर, हंबीरराव मोहिते यांच्या भूमिकेत आशुतोष राणा, सोयराबाईंच्या भूमिकेत दिव्या दत्ता तसेच औरंगजेबाच्या भुमिकेत अक्षय खन्ना, डायना पेंटी आणि गणोजीच्या भूमिकेत सारंग साठे आणि कान्होजीच्या भुमिकेत सुरवत जोशी यांनी काम केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Maddock Films (@maddockfilms)

Chhaava Storyline :

सिनेमाची सुरुवात तानाजीच्या म्हणजेच अजय देवगन च्या आवाजाने होते मराठ्यांचा रक्तरंजित इतिहास सांगताना अंगावर काटे उभे राहतात. सिनेमाच्या सुरुवातीलाच आपल्याला संभाजी महाराजांनी बुऱ्हानपूरवर केलेले आक्रमण पाहायला मिळते बुऱ्हानपूर जाळल्या नंतर संतप्त झालेला औरंगजेब स्वराज्यावर आक्रमण करण्यासाठी त्याची फौज पाठवतो पण प्रत्येक वेळी छत्रपती संभाजी महाराज ती फौज जमीनधोस्त करतात सिनेमात दाखवलेल्या लढायांमध्ये गोरिला वाॅरने लढलेल्या लढाया देखील दाखवलेल्या आहेत.

छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या नऊ वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एकूण 125 लढाया जिंकल्या आणि त्यातली एकही लढाई ते हरलेले नाहीत. चित्रपटात दाखवलेला भाग हा छत्रपती संभाजी महाराजांचा प्रामुख्याने उत्तरार्ध भाग दाखवलेला आहे. सिनेमाचा पहिला भाग हा त्यांच्या लढाया आणि त्यांच्यावर अनाजी पंताने घडवुन आणलेले शडयंत्र आणि त्याला हत्तीच्या पायी दिलेला इतिहास दाखवला आहे.

सिनेमाची शेवटची40 मिनिटे मात्र बघताना अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही आणि डोळे पाण्याने भरून जातील कारण पडद्यावर जे दाखवलं ते अगदी चित्त थरारक आहे छत्रपती संभाजी महाराजांच बलिदान सलग 40 दिवस सोसलेल्या यातना दुःख वेदना यावर प्रेक्षकांचे डोळे भरून आले होते.‌

छत्रपती संभाजी महाराजांबरोबरच कवी कलश यांचा साखळदंडातील संवाद मोठ्या पडद्यावर बघताना आपला राजा कसा होता त्यांनी आपल्यासाठी किती मोठ बलिदान दिलं आहे याची जाणीव होते. औरंग्याने त्यांच्या डोळ्यात तळपत्या गरम सळ्या घातल्या त्यांची जीभ काढली हातांची आणि पायांची नखे काढली खूप हाल हाल करून संपवण्याचा त्याने प्रयत्न केला पण शेवटच्या श्वासापर्यंत छत्रपती संभाजी महाराज त्याच्यापुढे झुकले नाहीत . ही कथा प्रामुख्याने चित्रपटात दाखवलेली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

Chhaava Positive :

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विकी कौशलची ॲक्टींग त्याने इतकी दिमाखदार निभावली आहे की, तो विकी कौशल नसुन खुद्द धाकलं धनीचं आहेत असं वाटतं. त्यांच्या पेहराव,तलवार,ढाली,घोडे आणि लढाईचे सिक्वेंस इतके धमाकेदार दाखवले आहेत की प्रेक्षक इतिहासात हरवुन जावू शकतो. इतिहासची तोडमोड न करता मांडलेली गोष्ट चित्तथरारक अनुभव देऊन जाते.

महाराणी येसूबाई यांच्या भुमिकेत रश्मिका मंदाना जरी सुट होत नसली तरीही तिने उत्तम प्रकारे ती भुमिका साकारलेली पहायला मिळते तसेच संतोष जुवेकर याने साकारलेला रायाजी आणि. कवी कलश यांनी दणकट कामे केली आहेत. अक्षय खन्नाने तर औरंगजेब इतिहासात आहे तसा हुबेहूब साकारला आहे त्याची क्रुरता, त्याचा मराठ्यांविरुद्ध असलेला व्देष त्यांने इतका अनोखा साकारला आहे की, त्याची प्रचंड चीड येते तो प्रेक्षकांच्या मस्तकात जातो. खऱ्याखुऱ्या औरंग्यालाही त्याने त्याच्याच भुमिकेत फिका पाडलेला पहायला मिळतो.

Chhaava negative :

छावा सिनेमात सगळ्यात बेकार गोष्ट म्हणजे सिनेमाचं संगीत आणि बीजीएम. सिनेमात जेव्हा लढाईचा भाग येतो तेव्हा सिनेमात दाखवलेलं बीजीएम आणि लढाईचा सिक्वेंस मॅच होत नाही. त्याचबरोबर येसूबाईंच्या भुमिकेत रश्मिका अजिबात सुट होत नाही. सिनेमाच्या पहिल्या भागामध्ये स्क्रिनप्ले इतका रटाळ आहे की तो अधिक खेचलेला वाटतो तसेच त्यांचे वीएफेक्स सुद्धा चुकलेले जाणवतात.

हे देखील वाचा : जयदीप अहलावत यांची क्राइम, सस्पेन्स-थ्रिलर वेब सिरीज ‘पाताल लोक’ प्राईम विडियो वर रीलीज. वाचा रिव्यू.