Mangla marathi movie review : चेहरा नाही तर कलेची ताकद दाखवणारा शिवाली परबचा ‘मंगला’ चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित. वाचा रिव्ह्यू.

Mangla marathi movie review
Mangla marathi movie review

चित्रपटाचे नाव: मंगला
प्रकाशन तारीख: १७ जानेवारी २०२५ 
सिनेमा टॉकीजचे रेटिंग : 9/10
कलाकार: शिवाली परब, शशांक शेंडे, अलका कुबल, विशाल राठोड, संजीव कुमार पाटील.
दिग्दर्शक: अपर्णा होसिंग

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Mangla marathi movie review 

आपल्याला मराठी रंगभूमीत सध्या महिलांवर आणि त्यांच्या संघर्षावर मांडलेले चित्रपट पाहायला मिळताहेत. याच विषयावर अजून एक चित्रपट आज चित्रपटगृहात प्रदर्शित झाला अपर्णा होसिंग दिग्दर्शित ‘मंगला’ हा चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीला आला.

यात महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम शिवाली परबने प्रमुख पात्राची भूमिका साकारली आहे. भारतातील पहिल्या ॲसिड हल्ल्याची गोष्ट या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळते. ‘मंगला’ म्हणजेच मंगला कपुर यांच्या ऍसिड हल्ल्याच्या घटनेवर हा चित्रपट मांडलेला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shivali Parab (@parabshivali)

Mangla movie storyline

या चित्रपटात शिवालीने ‘मंगला’ ही व्यक्तिरेखा अगदी उत्कृष्टपणे पडद्यावर उभी केली आहे. मंगला यांच्यावर ऍसिड हल्ला का केला जातो ? या मागचा प्रमुख गुन्हेगार कोण आहे आणि त्याचा शोध कसा लागतो ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला चित्रपटात पाहायला मिळतात ही झाली सिनेमाची एक बाजू पण सिनेमा दुसऱ्या बाजूने खूप काही गोष्टी सांगून जातो.

शिवालीने मंगला यांचे पात्र इतक्या जबरदस्तपणे पडद्यावर मांडले आहे की, त्याच्या वेदना थेट प्रेक्षकांच्या काळजाला भिडतात. त्याचबरोबर शशांक शेंडे अलका कुबल यांनी ज्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत त्या पण तेवढ्याच ताकतीच्या आणि वाखाणण्याजोग्या आहेत.

या चित्रपटात अजून एक जमेची बाजू आहे ती म्हणजे, ज्यांनी शिवालीचा मेकअप केला आहे. कारण जेव्हा शिवाली पडद्यावर येते तेव्हा प्रत्यक्षरीता मंगला हे पात्र तंतोतंत उभं राहिलेलं पाहायला मिळतं. गायन हे मंगला कपूर यांच्या आयुष्याची जमेची बाजू शिवालीने एकदम दमदार पद्धतीने मांडली आहे.

सिनेमाचा महत्त्वाचा भाग हा त्यांच्या शास्त्रीय संगीतातुनच प्रेक्षकांना भावनिक करून जातो. “तुझ्या दिसण्यापेक्षा तुझ्या असण्याला जेव्हा महत्व मिळत ना ! तेव्हा तू रसिकांच्या मनात पोचलेली असते !” हा अलका कुबल यांचा डायलॉग कथेला बळ देण्याचे काम करतो.

प्रामुख्याने ‘मगंला’ चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि लेखन चित्रपटात प्रभावीपणे मांडले आहे त्यामुळे चित्रपट पाहताना चित्रपटाच्या कथेची नाळ थेट प्रेक्षकांना जोडली जाते.

हे देखील वाचा : तब्बल १५ वर्षांनंतर “नव्या रुपात आणि नव्या ढंगात येतोय सिद्धार्थ जाधवचा हुप्पा हुय्या 2.”