paatal lok season 2 review : जयदीप अहलावत यांची क्राइम, सस्पेन्स-थ्रिलर वेब सिरीज ‘पाताल लोक’ प्राईम विडियो वर रीलीज. वाचा रिव्यू.

paatal lok season 2 review
paatal lok season 2 review

चित्रपटाचे नाव: पाताल लोक 
प्रकाशन तारीख: १७ जानेवारी २०२५ 
सिनेमा टॉकीजचे रेटिंग : 7.5 /10
कलाकार: जयदीप अहलावत,अभिषेक बॅनर्जी, अश्वाक सिंग, गुल पणग, अनुराग अरोरा, निकीता ग्रोवर, नीरज खाबी
दिग्दर्शक: अविनाश अरुण धवारे
निर्माता: सुदीप शर्मा

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

paatal lok season 2 review 

कोरोना महामारीच्या काळात प्रदर्शित झालेली जयदीप अहलावत यांची क्राइम, सस्पेन्स-थ्रिलर वेब सिरीज ‘पाताल लोक’ प्रेक्षकांना खूपच आवडली होती. मात्र, निर्मात्यांनी या सिरीजचा शेवट समाधानकारक वळणावर संपवला होता. तरीही, निर्मात्यांनी या सिरीजचा दुसरा सीझन (Paatal Lok 2) जाहीर करत प्रेक्षकांमध्ये उत्साह निर्माण केला.

2020 मध्ये आलेली आणि अविनाश अरुण यांनी दिग्दर्शित व सुदीप शर्मा यांनी निर्मित ‘पाताल लोक’ सिरीज लवकरच एक बेंचमार्क ठरली. आता या सिरीजचा दुसरा सीझन देखील प्रदर्शित होत आहे, जो ट्विस्ट आणि रहस्यांनी भरलेला आहे. तर चला, जाणून घेऊया ‘पाताल लोक 2’ ची कथा कशी आहे?

 

View this post on Instagram

 

A post shared by prime video IN (@primevideoin)

paatal lok season 2 storyline 

पाताल लोक सीझन 2 ची कथा नागालँड मधील एका हाय-प्रोफाईल आणि संशयास्पद व्यापारी व राजकारण्याच्या खळबळजनक हत्येच्या तपासाने सुरू होते. या प्रकरणाचा तपास हातीराम म्हणजेच ‘जयदीप अहलावत’ यांच्या ज्युनियर ‘इमरान अंसारी’ म्हणजेच ‘ईश्वाक सिंग’  याला सोपवण्यात आला आहे. या सीझनमध्ये जयदीप अहलावत अजूनही जमनापार पोलीस ठाण्यात इन्स्पेक्टरच्या भूमिकेत आहेत, मात्र त्यांचा ज्युनियर इमरान अंसारी आता एसीपी बनलेला आहे.

‘हातीराम’ आणि ‘इमरान’ अंसारी भारताच्या अशा कोपऱ्यात हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी जातात, ज्याबद्दल त्यांना काहीही माहिती नसते. जसजसे ते दोघे या प्रकरणाच्या खोलात जातात, तसतसे त्यांचे डोळे आणि मेंदू थक्क होऊन जातात. ट्विस्ट आणि सस्पेन्सने भरलेला पाताल लोकचा दुसरा सीझन अनेक रहस्ये उलगडतो, जी जाणून घेण्यासाठी तुम्हाला ही सिरीज नक्कीच पाहावी लागेल.

पाताल लोक 2 मध्ये जयदीप अहलावत यांच्या अभिनयाबद्दल बोलायचे झाले तर, त्यांनी आपल्या अप्रतिम अभिनयाने हातीराम हे पात्र इतके जिवंत साकारले आहे की, ते अभिनेता नसून प्रत्यक्षात हातीरामच असल्यासारखे वाटते, जो दिल्लीच्या एका पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल आहे.

या सीझनमध्ये प्रत्येक पात्राने आपापली उत्कृष्ट कामगिरी सादर केली आहे. तसेच, नागालँडच्या संवेदनशीलतेचा विचार करून या सिरीजमध्ये अनावश्यक हिरोइझम आणि मोठमोठे संगीत आणि फालतू सेक्स सीन्स दाखवलेले नाहीत. मात्र, यात शिव्या मात्र जरूर आहेत. ही सिरीज एकूण ८ तासाची आहे आणि प्रत्येक एपिसोड ४५ मिनिटांचा आहे.